मनःस्थिती

हृदयाची धडधड वाढवते
जीवाला घोर लावते
सतत अस्वस्थ करते
वाट पहाणे ।

मन आनंदी होते
जग सुंदर वाटते
हसत रहावेसे वाटते
जेव्हा यश मिळते ।

वेळ खायला उठतो
कामात रस नसतो
प्रगतीचा आलेख खाली जातो
जेव्हा अंगात कंटाळा भरतो ।

डोळे सतत भरून येतात
मनात भावना थैमान घालतात
जगणं नकोसे करून सोडतात
दुःखाचे जेव्हा विचार येतात ।

नाती जपली जातात
बोलणी आपुलकीची असतात
कुटुंब एकत्र असतात
जेव्हा माणसे मायेची असतात ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ