द्विचरण

पेल्यातील नीर जीवन, ढगफुटीमुळे मरण
दुःखदायक स्वैराचार, आनंदास संस्कार कारण ।

अर्थ : तहानलेल्याला पेल्यातून पाणी दिले जाते तेव्हा त्याची तृष्णा भागते. मरणासन्न व्यक्तिस पाणी जीवनदायी ठरते. तेच पाणी ढगफुटीमुळे अनेकांच्या मृत्युस कारणीभूत ठरते. अर्थात जर काहीही बंधने नसतील तर विनाश अटळ आहे. मनुष्याचे तसेच आहे. अनिर्बंध जगणे दुःखच देते. आनंदी आयुष्यासाठी संस्काररूपी बंधने आवश्यक आहेत.

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ