किती रे करशील राग राग, तापशील आपला आपण
वणव्यात जळते लाकूड,भावनेत जळशील तू पण ।

अर्थ : हा मनाबरोबरचा संवाद आहे. बर्‍याचदा आपल्याला खूप राग येतो. त्याची कारणे वेगवेगळी असतात. कोणाला मनाविरूद्ध झाले म्हणून तर कोणाला अन्याय झाला म्हणून. त्यामुळे आपण मनातल्या मनात खूप राग राग करतो. माणसाचा, परिस्थितीचा किंवा नशिबाचा. पण असे केल्याने आपल्यालाच त्रास होतो. जसे वणवा लागल्यावर त्याला कारणीभूत ठरणारे लाकूड जळून नष्ट होते, तसे तीव्र भावनांच्या आहारी गेल्यामुळे स्वतःलाच खूप त्रास होतो. व कदाचित या देहाचे बरेवाईट देखील.

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ